बी.टेकचे विद्यार्थी आता गिरवणार पुनर्जन्माचे धडे
बी.टेक प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना इंट्रोडक्शन टू कॉन्शियसनेस अँड वेलबीइंग हा विषय शिकवला जाणार आहे.
एज्युवार्ता न्युज नेटवर्क
भारतातील प्रमुख अभियांत्रिकी महाविद्यालयांपैकी (College of Engineering) एक असलेल्या आयआयटी मंडी (IIT Mandi) येथील बी.टेकच्या विद्यार्थ्यांना (b.tech student) पुनर्जन्माबद्दल (reincarnation) देखील शिकवले जाणार आहे. महाविद्यालयाने या विषयाचा अभ्यास अनिवार्य (mandatory subject) केला आहे.
मीडिया रीपोर्टनुसार, या विषयाला 'इंट्रोडक्शन टू कॉन्शियसनेस अँड वेलबीइंग' असे नाव देण्यात आले आहे. बी.टेक प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना हा विषय शिकवला जाणार आहे. अहवालानुसार,हा विषय आयआयटी मंडीच्या भारतीय ज्ञान प्रणाली विभागाने सादर केला आहे. त्यात सूक्ष्म शरीर,पुनर्जन्म, मृत्यू आणि शरीराबाहेरील अनुभव यासारख्या विषयांचा समावेश आहे.भारतीय ज्ञान प्रणाली विभागाची स्थापना 2020 मध्ये झाली.पारंपारिक भारतीय ज्ञानाचा प्रसार करणे हा त्याचा उद्देश आहे.
अभ्यासक्रमात चेतनेची तत्त्वे,भारतीय कला आणि नृत्याचे मेंदूवर होणारे परिणाम,सर्वोच्च चेतना या विषयांचाही समावेश आहे. याशिवाय,विद्यार्थी पाश्चात्य वैद्यकीय आणि आयुर्वेदिक दोन्ही दृष्टीकोनातून मानवी शरीराची रचना आणि कार्यक्षमता तसेच शरीर-मनाचा संबंध आणि ध्यान धारणा या विषयांचा अभ्यासही करतील.
तसेच IIT मंडीतील विद्यार्थ्यांसाठी आठवड्यातून एकदा भगवद्गीता पठण आणि योगाचे वर्गही अनिवार्य करण्यात आले आहेत. दरम्यान,सध्या बी.टेकच्या विद्यार्थ्यांना असे विषय सक्तीचे करण्यावरून वाद सुरू झाला आहे. विद्यार्थ्यांवर धार्मिक प्रथा लादल्याचा आरोपही संस्थेवर होत आहे.